परशुराम
परशुराम हे भगवान विष्णूंचा सहावा अवतार समजले जातात.[१] त्यांचा जन्म जमदग्नी व रेणुकामाता यांच्या पोटी वैशाख शुक्ल तृतीयेला (अक्षय्य तृतीयेला) झाला. [२]
रेणुका
रेणुका/ येल्लुआई/ येल्लम्मा,( कन्नड: ಶ್ರೀ ಎಲ್ಲಮ್ಮ ರೇಣುಕಾ, तेलुगू: శ్రీ రేణుక/ ఎల్లమ్మ)
👉 ही पतितांची देवी म्हणून पूजली जाते.
ग्रामीण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात देवीचे उपासक आढळतात.
👉भक्त तिला "संपूर्ण जगाची आई" किंवा "जगदंबा" मानतात.
यल्लम्मा देवी हे कालीचेच रूप मानले जाते. यल्लम्मा देवीचा एक हात अहंपणाचा नाश करणारा आणि दुसरा हात हा भक्तांवर वरदहस्त दाखवणारा आहे. यल्लम्मा देवीची दक्षिण भारतात मुख्यत्वे पूजा होते आणि तिथे ती महाकाली, जोगम्मा, सोमालम्मा, गुंड्डम्मा, पोचम्मा, मायसम्मा, जगदम्बिका, होलियम्मा, रेणुकामाता, येल्लम्मा, मरिअम्मा आणि रेणुका देवी अशा विविध नावांनी ओळखली जाते. खाली चित्रात दाखविलेले मंदिर हे भारताच्या महाराष्ट्रराज्याच्या नांदेड जिल्ह्यातील माहूर या आदिवासीबहुल भागातील गावाजवळील माहूरगडावर आहे.
रेणुका ही इक्ष्वाकु वंशातील रेणु (प्रसेनजित) नावाच्या राजाची कन्या, आणि जमदग्नी ऋषीची पत्नी होती. या जोडप्याला पाच मुलगे होते त्यांतला एक परशुराम होता.
आख्यायिका
शिवाची पत्नी पार्वती ने कुब्ज देशाच्या रेणु नावाच्या राजाच्या घरी जन्म घेतला. रेणुची मुलगी ती रेणुका असे तिचे नाव रेणुका झाले.
शंकराचे अवतार असलेल्या जमदग्नीसमवेत तिचे लग्न झाले. त्यांचे आश्रमात कामधेनू गाय होती.
त्या ठिकाणचा राजा सहस्रार्जुनाला ही गाय आपल्याकडे असावी असे वाटू लागले.
👉जमदग्नी ऋषींनी त्याची मागणी अमान्य केली.
👉त्याने जमदग्नींचा पुत्र परशुराम हा आश्रमात नाही असे बघून आश्रमावर हल्ला केला व जमदग्नींना ठार मारले.
👉परशुरामाने कोरी भूमी म्हणून माहूर चे स्थान अंत्यविधी साठी निवडले.
👉त्यावेळेस रेणुका सती गेली. 🤭
परशुरामास आईची खूप आठवण येउ लागली. त्यावेळेस आकाशवाणी झाली की तुझी आई भूमीतून वर येउन तुला दर्शन देईल, पण तू मागे पाहू नकोस. मात्र काही वेळाने परशुरामाने मागे पाहिले तेव्हा रेणुकेचे फक्त डोके जमिनीतून बाहेर आले होते; बाकी भाग जमिनीतच राहिला. या डोक्यास (शिरास) 'तांदळा' म्हणतात.
रेणुकामातेचा उल्लेख महाभारत, हरिवंश आणि भागवत पुराणात आढळतो.
रेणु राजाने शांती आणि उत्तम आरोग्यासाठी यज्ञ केला. यज्ञाच्या अग्नीतून रेणुका देवीचा जन्म झाला.
रेणुका लहानपणापासूनच अत्यंत तेजस्वी, चपळ आणि लाघवी होती.
वयाच्या आठव्या वर्षी अगस्ती ऋषींनी रेणु राजाला रेणुकेचा विवाह जमदग्नींबरोबरकरण्याचे सुचवले.
जमदग्नी हे रुचिक मुनी आणि सत्यवती यांचे पुत्र होते;
खडतर तप करून त्यांनी देवांचे आशीर्वाद संपादन केले होते.
लग्न झाल्यावर रेणुका आणि जमदग्नी मुनी सध्याच्या बेळगाव जिल्ह्याच्या सौंदत्ती भागात असलेल्या रामशृंग पर्वतराजीमध्ये राहत होते.
रेणुका जमदग्नी मुनींना पूजाअर्चेत मदत करत असे.
रेणुका दररोज भल्या पहाटे उठून मलप्रभा नदीवरस्नानासाठी जात असे. ती हा नित्यक्रम अतिशय निग्रहाने करत असे.
ती किनाऱ्यावरील वाळूचे मडके बनवत असे आणि
जमदग्नींसाठी त्यात पाणी भरून आणत असे.
पाणी मडक्यात भरल्यावर तिथे असलेल्या सापाचे वाटोळे ती आपल्या डोक्यावर ठेवून त्यावर ती मडके ठेवून ती घरी जात असे.
जमदग्नी मुनी तिने आणलेल्या मलप्रभा नदीच्या पाण्याने शुचिर्भूत होऊन धार्मिक कर्मे करत असत.
👉 (रेणुका शब्दाचा संस्कृत अर्थ वाळूचे अत्यंत लहान कण असा आहे.)
एक दिवशी रेणुका नदीवर गेली असताना तिने
👉काही गंधर्वयुगुलांना जलक्रीडा करताना पाहिले आणि नकळतच तिचे चित्त चंचल झाले.
आपणही आपल्या पतीसोबत जलक्रीडा करावी अशी इच्छा तिच्या मनी उपजली आणि ती त्या स्वप्नात रममाण झाली.
जेव्हा ती भानावर आली तेव्हा तिला झाल्या प्रकाराचा पश्चाताप केला. बराच उशीर झाल्याने तिने पटपट आंघोळ आटपली आणि वाळूचे मडके बनवण्याचा प्रयत्न करू लागली.
👉चित्त ढळल्यामुळे ती मडके बनवूच शकली नाही.
👉सापाला पकडण्याचा प्रयत्न करताच साप देखील अदृश्य झाला.
👉 निराश होऊन रेणुका रिकाम्याहाती जेव्हा आश्रमात परत आली, तेव्हा जमदग्नी प्रचंड चिडले आणि त्यांनी तिला दूर जाण्यास सांगितले.
पतिशापाने विवश झालेली रेणुका पूर्वेकडे निघून गेली, आणि एका निबिड अरण्यात तप करू लागली.
तिथे ती संत एकनाथ आणि जोगीनाथ यांना भेटली, तिने त्यांना सर्व झालेला प्रकार सांगितला आणि आपल्या पतीचा राग कमी करण्याचा मार्ग सुचविण्याचे सांगितले.[ संदर्भ हवा ]
त्यांनी आधी रेणुका मातेला शांत केले आणि एक मार्ग सुचवला. त्यांनी तिला शुद्धीकरणासाठी नजीकच्या तलावात स्नान करण्याचे सांगितले आणि मग त्यांनी दिलेल्या शिवलिंगाची पूजा करण्यास सांगितले. त्यानंतर
जवळपासच्या गावात जाऊन घरोघर फिरून जोगवा मागण्यास सांगितले.
जोगव्यात मिळालेले अर्धे तांदूळ संतांना दान करायला सांगितले आणि उरलेल्या अर्ध्या तांदुळामध्ये गूळ घालून प्रसाद बनवण्याचे सांगितले.
असा नित्यक्रम जर तीन दिवस श्रद्धेने केला तर चौथ्या दिवशी पतीची भेट होईल. त्यानंतरही जमदग्नींचा राग पूर्णपणे मावळेल असे वाटत नाही; लौकरच तुझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ येणार आहे, असे सुचवले. पण हा काही काळ लोटल्यावर तुझे नाव अमर होईल, तुझ्या पतीसमवेत तुझी अखंड पूजा होत राहील, असे म्हणून ते अदृश्य झाले. रेणुका देवीने अत्यंत निग्रहाने शिवलिंगाची पूजा केली आणि चौथ्या दिवशी ती आपल्या पतीस भेटण्यास गेली.
रेणुका देवींना पाच पुत्र होते.
वसु, विश्वावसु, रुमण्वत्(बृहत्भानु/मरुत्वत्), सुषेण(बृहत्कर्मन्) आणि रंभद्रा.
रंभद्रा हा सर्वात कनिष्ट आणि सर्वात आवडीचा पुत्र होता.
भगवान शंकर आणि पार्वतीचा वरदहस्त लाभलेला रंभद्रा हाच परशुराम म्हणून ओळखला जातो.🤐😬🤯🤯🤯
जमदग्नींचा राग अजून मावळला नव्हता.
त्यांनी आपल्या चार ज्येष्ठ पुत्रांना आपल्या आईला शिक्षा करण्याचे सांगितले. चारही पुत्रांनी ती आज्ञा पाळली नाही. जमदग्नी ऋषींनी रागाने चारही पुत्रांचे भस्म केले.
ते पाहून रेणुका देवी रडू लागल्या, तितक्यात परशुराम तिथे आले. जमदग्नींचा राग तरीही शांत झाला नव्हता, त्यांनी परशुरामाला घडलेला प्रकार सांगितला आणि आपल्या आईचा शिरच्छेद करण्याचे फर्मावले. परशुरामाने थोडा विचार केला, आपल्या वडिलांचा राग लक्षात घेऊन त्यांनी कुऱ्हाडीने आपल्या मातेचा शिरच्छेद केला.
ते पाहून जमदग्नींनी परशुरामाला एक वर दिला.
🤣😂😅😅😅😂😂🤣😂😂😂😂
परशुरामाने लगेच आपल्या आई आणि भावांचे प्राण परत मागितले. रेणुका मातेच्या आत्म्याची अनेक रूपे झाली आणि ती सर्वत्र पसरली, शिवाय रेणुका माता पुन्हा जिवंत झाली. हा चमत्कार पाहून सर्व रेणुका मातेचे भक्त झाले.
🤣😂🤣😂😂😂😂😂😂😂🤣😂😂😂😂🤣😂
रेणुका आणि येल्लम्मा
रेणुका आणि येल्लम्मा ही दोन्ही एकाच देवीची दोन नावे आहेत.
एका दंतकथेनुसार परशुराम जेव्हा आपल्या आईचा शिरच्छेद करण्यासाठी तिच्यामागे धावत गेला तेव्हा रेणुका एका दलित वस्तीमध्ये शिरली.
परशुरामाने रेणुका देवीला शोधून काढले आणि तिचा शिरच्छेद केला, तसेच रेणुका देवीचा प्राण वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या दलित महिलेचेही शिर धडावेगळे केले.
जमदग्निंच्या आशिर्वादाने रेणुका देवीला पुनर्जीवित करताना चुकीने दलित महिलेचे शिर रेणुकामातेच्या शरीरावर लावले गेले आणि दलित महिलेच्या शरिरावर रेणुका देवीचे मस्तक ठेवले गेले.
दलित महिलेचे शीर लाभलेल्या रेणुकाला जमदग्मींनी पत्नी म्हणून स्वीकारले आणि रेणुकेचे मस्तक लाभलेल्या दलित महिलेला दलित समाजात येल्लम्मा देवी म्हणून पुजले जाऊ लागले.
🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪
रेणुकादेवी (माहूर)
हा मुखवटा सुमारे ५ फूट उंच असून ४ फूट रुंद आहे.तेथील बैठकीवर सिंह हे देवीचे वाहन कोरले आहे. गाभाऱ्यास चांदीचा पत्रा मढविला आहे.या मंदिरामागे परशुरामाचे मंदिर आहे.
कालसापेक्षता
👉आधुनिक पुराणशास्त्रवेत्त्यांच्या मते परशुरामाचा जन्म इ.स.पू. १५८८ या साली झाला.
👉परशुराम ज्या भार्गव कुळात जन्मला ते कुल इ.स.पू. २५५० पासून अस्तित्वात होते.
हेही पाहा
| परशुराम | |
कार्तवीर्याशी लढणार्या परशुरामाचे चित्र (मूळ: जयपूर, इ.स. एकोणिसावे शतक) | |
| निवासस्थान | कन्नोज |
| शस्त्र | परशु |
| वडील | जमदग्नी |
| अन्य नावे/ नामांतरे | भार्गव, भार्गवराम, जामदग्न्य |
| या अवताराची मुख्य देवता | विष्णू |
कार्य
जन्माने ब्राह्मण असून क्षत्रियांचे सर्व गुण त्यांच्यात होते, म्हणूनच त्यांना "शरादपि शापादपि" असे म्हणतात. भगवान शंकरांकडून त्यांनी परशू हे शस्त्र घेतले आणि अनेक विद्या आत्मसात केल्या. त्याच विद्यांच्या जोरावर त्यांनी दुष्ट आणि प्रजेला जाच करणाऱ्या राजांचा बंदोबस्त केला. त्याच वेळी त्यांनी सहस्रार्जुनाला ठार केले. पुढे राजांना जिंकून ताब्यात घेतलेली जमीन त्यांनी ऋषिकुलाला देऊन ते महेन्द्र पर्वतावर तप करण्यासाठी निघून गेले.
परशू एक कुर्हाडीसारखे दिसणारे शस्त्र आहे. याचा उपयोग लाकूडतोडी तसेच युद्धात असा दोन्ही प्रकारे होऊ शकतो.
परशुराम याचा वापर करीत असत. त्यावरुनच त्यांचे नाव पडले.
त्यानंतर त्यांचा उल्लेख, रामायणात सीता स्वयंवरात येतो. तेथे त्यांनी शिवधनुष्य तोडणाऱ्या रामाला आव्हान दिले. मात्र राग शांत झाल्यावर त्यांनी रामाला आपल्याकडील धनुष्य भेट दिले व विद्या दिली. त्यांनी महाभारत काळी, भीष्मांना त्या सगळ्या विद्या दिल्या. नंतर अंबेच्या याचनेवरून त्यांनी भीष्मांशी युद्ध केले. भीष्म हरले पण तरीही त्यांनी अंबेशी लग्न करण्यास नकार दिला.
परशुरामाची मंदिरे
परशुरामाने केलेल्या कोकण प्रदेशाच्या निर्मितीच्या कथा रंजक आहेत. असे मानले जाते की कोकणाच्या भूप्रदेशाची निर्मिती परशुरामाने समुद्र ४०० योजने मागे हटवून केली आहे. म्हणूनच परशुरामाला सप्त कोकणांचा देव म्हणतात. [३]संपूर्ण भारतात समुद्रालगतच्या राज्यांमध्ये परशुरामाची ही कथा सांगितली आणि ऐकली जाते. त्यामुळे संपूर्ण भारतभर परशुराम क्षेत्रे आहेत.
केरळची भूमी परशुरामाने निर्माण केली असेही मानले जाते.[३] तिथेही एक परशुराम क्षेत्र आहे. ओरिसा, आसाम, गुजरात आणि पंजाबमध्येही परशुराम क्षेत्र आहे. तसेच ते कोकणातही आहे. परशुराम हे अमर्त्य किंवा चिरंजीव मानले गेले आहे. त्यामुळे त्यांचा कायम निवास असतो असा समज आहे. महाराष्ट्रात चिपळूणपासून ४ कि.मी. अंतरावर मुंबई-गोवा हायवेवर एक हजार फूट उंचीचा डोंगर आहे. ह्याला महेंद्रगिरी असे नाव आहे. परशुरामाच्या मंदिरामुळे लगतच्या गावालाही परशुराम किंवा लोटे परशुराम असेच म्हणतात.[४]
परशुरामाच्या या मंदिराच्या रचनेमध्ये मोगल वास्तुकलेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. विशेषत: मंदिराचे घुमट बघतांना ते प्रकर्षाने जाणवते. या मंदिराचे घुमट सरळ उतार असलेले अष्टकोनाकृती आहेत. आणि उंच कळस तसेच मंदिरातल्या शिल्पकृती हे मिश्रण स्पष्टपणे दाखवतात. उपलब्ध पुराव्यानुसार इथला तिसरा घुमट हा आदिलशहाच्या बेगमांपैकी एकीने उभारला आहे. यामागे एक कथाही सांगितली जाते ही अशी---
एकदा या बेगमेची तारवे समुद्रात बुडाली होती. या बेगमेला समुद्राचा देव म्हणून परशुराम माहिती होता. तिने नवस बोलला की, तारवे परत आल्यास देऊळ बांधीन. त्यानंतर तिची तारवे खरोखरच सुखरूपपणे किनाऱ्याला लागली. परशुरामाचे मंदिर बांधून तिने नवस फेडला.
या मंदिरामध्ये काळ, काम आणि परशुराम यांच्या मूर्ती आहेत. मध्यभागी असलेली परशुरामाची मूर्ती इतर दोन मूर्त्यांपेक्षा उंच आहे. मंदिरातली लाकडावर केलेली कलाकुसर सुरेख आहे. या मंदिराचा वार्षिक उत्सव म्हणजे परशुरामाचा जन्मोत्सव. परशुरामाचा जन्म अक्षय्य तृतीयेचा, त्यामुळे अक्षयतृतीयेपासून सुरू होणारा हा उत्सव पुढे तीन दिवस चालतो. यावेळेस मंदिराचा परिसर सुशोभित करण्यात येतो. परशुरामाच्या जन्मोत्सवानिमित्त कीर्तनाचे व भजनाचे कार्यक्रम आखले जातात. या मंदिरात महाशिवरात्रीही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याशिवाय परिसरातल्या वारकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की, मार्गशीर्ष एकादशीलाप्रत्यक्ष विठ्ठल पंढरपूरहून महेंद्रगडवर येतो. त्यामुळे मार्गशीर्ष एकादशीला इथे मोठी यात्रा भरते. परिसरातले वारकरी त्यादिवशी इथे दर्शनाला येतात. कोकणचा सर्वांग सुंदर निसर्ग, दूरवर दिसणार्या कौलारू घरांची चित्रमय रचना असलेली गावे, या सुंदर देखाव्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानाची आणि निर्मोही वृत्तीची चिरंतर प्रेरणा देणाऱ्या परशुरामाचे हे मंदिर भेट देण्यासारखे आहे.
माहूर गडावर, श्री रेणुका मातेच्या मंदिराच्या मागे परशुरामाचे एक प्राचीन मंदिर आहे.[५]
उत्तर प्रदेशातील गढवालमधील जौनपूर बावर येथे ४०० वर्षे जुने परशुराम मंदिर आहे.
परशुराम हे विष्णूच्या दशावतारामधील एक अवतार आहेत. त्यांनी पृथ्वीवरील अधर्मी क्षत्रियांचा संहार केला आहे. त्यांच्या दानशीलतेवर प्रसन्न होऊन विष्णूने त्यांचा द्वारपाल होणे पसंत केले.
शरादपि शापादपि
अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः । इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।
अर्थः चार वेद मुखोद्गत आहेत (संपूर्ण ज्ञान) आणि पाठीवर बाणासह धनुष्य आहे (शौर्य) - म्हणजेच ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज दोन्ही असल्याने शाप अणि शस्त्र अशा दोन्ही गोष्टींचा उपयोग जो जाणतो [तो परशुराम].[६]
चिरंजीव परशुराम
परशुरामाच्या अवतार कार्य संपल्याचे कोणत्याही ग्रंथात उल्लेख आला नसल्याने परशुराम हे सात चिरंजीवांमधीलएक आहेत असे समजले जाते.[७]
परशुरामावरील पुस्तके
- परशुधारी परशुराम (सुधाकर शुक्ल)
- श्री परशुराम स्थलयात्रा (सौ. गीता आदिनाथ हरवंदे)
- भगवान परशुराम (बालसाहित्य, लेखक : मोरेश्वर माधव वाळिंबे)
- भारतीय संस्कृतीचे शिल्पकार युगपुरुष परशुराम (शुभांगी भडभडे)
- भृगुनंदन (७०० पानी पुस्तक, लेखिका भारती सुदामे)
पहा :जयंत्या
संदर्भसंपादन करा
- ^ Bhatt, Shyam Sundar (2018-05-15). Kaljayee Shree Parshuram (हिंदी भाषेत). Notion Press. ISBN 978-1-64249-957-5.
- ^ Vipāsā (हिंदी भाषेत). Bhāshā evam Saṃskr̥ti Vibhāga. 1992.
- ↑ a b Dinkar, Ramdhari Singh (1993-01-01). Parsuram Ki Pratiksha (हिंदी भाषेत). Lokbharti Prakashan. ISBN 978-81-85341-13-2.
- ^ Kokaṇa vikāsa. Kokaṇa Vikāsa Mahāmaṇḍaḷa. 1993.
- ^ GANGASHETTY, RAMESH (2019-10-30). THIRTHA YATRA: A GUIDE TO HOLY TEMPLES AND THIRTHA KSHETRAS IN INDIA (इंग्रजी भाषेत). Notion Press. ISBN 978-1-68466-134-3.
- ^ The Individual and Society (इंग्रजी भाषेत). Pearson Education India. 2005-09. ISBN 978-81-317-0417-2.
|date=मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Joshi, Rucha (2016-01-20). Face: A Journey Beyond Time and Space (इंग्रजी भाषेत). Partridge Publishing. ISBN 978-1-4828-6937-8.
Comments
Post a Comment