SAMRAT ASHOKA
| सम्राट अशोक | ||
|---|---|---|
| धम्माराखित, धर्माराजिका, धम्माराजिका, धम्मारद्न्य, चक्रवार्तीं, सम्राट, राद्न्यश्रेष्ठ, मगधराजन, भूपतिं, मौर्यराजा, आर्याशोक, धर्माशोक, धम्मशोक, असोक्वाध्हन, अशोकवर्धन, प्रजापिता, धम्मानायक, धर्मनायक | ||
| चित्र:Ashoka2.jpg | ||
| सम्राट अशोक | ||
| अधिकारकाळ | २७२ इ.स.पू- २३२ इ.स्.पू. | |
| राज्याभिषेक | २५८ इ.स्.पू. | |
| जन्म | ३०४ इ.स्.पू. | |
| पाटलीपुत्र, बिहार | ||
| मृत्यू | २३२ इ.स्.पू. | |
| पाटलीपुत्र, बिहार | ||
| पूर्वाधिकारी | बिंदुसार | |
| उत्तराधिकारी | दशरथ मौर्य | |
| वडील | बिंदुसार | |
| आई | धर्मा | |
| पत्नी | महाराणी देवी | |
| इतर पत्नी | पद्मावती, तिश्यरक्षा | |
| संतती | राहुल, संघमित्रा, महेंद्र | |
| राजघराणे | मौर्य | |

बालपण व सुरुवातीची कारकिर्द[]
अशोक हा बिन्दुसार या मौर्य सम्राटाचा पुत्र होता. बिन्दुसार यांना अनेक पत्न्या होत्यातील त्यातील धर्मा ही अशोक ची आई होती. अशोक हा बिन्दुसाराच्या अनेक पुत्रामध्ये शेवटून दुसरा धाकटा होता त्यामुळे अशोक मौर्य सम्राट बनेल अशी कोणाची आपेक्षा नव्हती. परंतु अशोकची सेनानी बनण्याची क्षमता वादातीत होती. त्यामुळे साहजिकच इतर भावांचा त्यावरील दुस्वास वाढला होता. चंद्रगुप्त मौर्याने जेव्हा जैन धर्म स्वीकारून राज्य सुखाचा त्याग केला त्यावेळेस त्याने तलवार फेकून दिली ही तलवार अशोकाने सापडवून अशोकने आपल्याजवळच ठेवली. अशोक लहानपणी अतिशय तापट व खोडकर होता. तसेच चांगला शिकारी ही होता. त्याला तत्कालीन राजपुत्रांना मिळणारे सर्व शिक्षण मिळाले होते. त्याच्यातील सेनानीचे गुण ओळखून बिन्दुसाराने तरुणपणी त्याला अवंतीचा उठाव मोडण्यास पाठवले होते जे त्याने सहज पार पाडले.
राज्यरोहण[]
अशोकचे जसजसा सेनानी म्हणून परिपक्व होत गेला तसतसे त्याच्या भावांचा त्यावरील दुस्वास ही वाढत गेला. अशोकने मौर्य सैन्याच्या अनेक तुकड्यांचे यशस्वीपणे नेतृत्व केले होते तसेच त्याच्या एका मागोमागच्या मोहिमांमुळे त्याची राज्यभर किर्ती दुमदुमत लागली. त्यामुळे त्याच्या भावांना असे वाटले की बिन्दुसार अशोकलाचा सम्राट बनण्यास प्राधान्य देतील. अशोकचा दुःस्वास करण्यात आघाडीवर होता बिन्दुसारचा ज्येष्ठ पुत्र सुसीम, सुशीमने अशोकला व्यस्त ठेवण्यासाठी अशोकलातक्षशिला येथील मोहिमेवर पाठवण्यास सांगितले. जिथे सुसीम अधिकारी असताना अनेक उठाव झाले होते. अशोक येण्याच्या बातमीने उठाव शमला व अशोकची कीर्ती अजून वाढत गेली. त्या भागात पुन्हा उठाव झाला परंतु तो क्रुरतेने चिरडला गेला.)
अशोकच्या यशाने त्याच्या भावांवरील दुःस्वास अजून वाढला, घरातील वाढत्या अशांततेमुळे व सुसीमने बिन्दुसारला अशोकाविरुद्द भडकावले, या वादातून तात्कालीन मार्ग म्हणून बिन्दुसारने अशोकला काही काळ अज्ञातवासात जाण्याचा सल्ला दिला जो त्याने पाळला. या काळात अशोकने कलिंग मध्ये जाउन वास्तव्य केले. या काळात त्याची कौरवाकी या कोळी मुलीशी ओळख झाली जी नंतर अशोकची दुसरी अथवा तिसरी पत्नी बनली. अशोकच्या काही कोरीवकामांवर तिचे उल्लेख आहेत.
मध्यतरीच्या काळात उज्जैन मध्ये हिंसक उठाव झाला, बिन्दुसारने अशोकला अज्ञातवासातून बाहेर येऊन हा उठाव शमवण्यास सांगितले. अशोक उज्जैनला गेला व एका लढाईत घायाळ झाला. याकाळात असे मानतात की सुसीमद्वारे अशोकवर अनेक हिंसक हल्ले झाले जे परतावून लावण्यात आले. अशोकची सुश्रुशा करण्यासाठी बौद्ध धर्मिय परिचारकांची नेमणूक करण्यात आली होती. यातील एक परिचारीका देवी हिच्याशी अशोकचा विवाह झाला. देवी ही विदिशा येथील एका व्यापाऱ्याची मुलगी होती. ती बौद्ध धर्मिय असल्याने बिन्दुसाराला हा विवाह पसंत पडला नाही त्याने अशोकला पाटलीपुत्र मध्ये रहाण्यास मनाई केली व अशोकला उज्जैन येथील प्रमुख करून टाकले.
पुढील काही वर्षे अशोकची शांतीमय गेली. बिन्दुसारचे इसापूर्व २७३ मध्ये निधन झाले व सुसीम अशोकचा काटा काढण्यास अजून सक्रिय झाला. या प्रयत्नात देवीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला ज्यात अशोकची आई मारली गेली. या घटनेने संतप्त झालेल्या अशोकाने पाटलीपुत्रवर आक्रमण केले व लवकरच पाडाव केला व आपल्या सर्व बंधूंची हत्या केली. यानंतर अशोकाची महत्त्वाकांक्षा वाढीस लागली. मगध साम्राज्याचा सम्राट बनून त्याने अनेक प्रांत एकामागोमाग पार करण्याचा सपाटा लावला. या काळात अशोकला चंड-अशोक म्हणू लागले व एक क्रूरकर्मा अशी त्याची ओळख तयार होऊ लागली.
राज्यरोहण झाल्यानंतर आठ वर्षांच्या काळात अशोकने अनेक प्रदेश मगध साम्राज्याला जोडले व मौर्य साम्राज्याचा विस्तार पूर्वेस ब्रम्हदेशाच्या सीमेपर्यंत तर पश्चिमेकडे बलुचिस्तान- इराणच्या सीमे पर्यंत, उत्तरेस अफगाणिस्तान व दक्षिणेस केरळ पर्यंत वाढवला. जवळपास सर्व भारत त्याने एका साम्राज्याच्या छायेत आणला व आपली एकछत्री सत्ता लागू केली.
कलिंग चे युद्ध हे भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. अशोक वर नमूद केल्याप्रमाणे युद्धखोर झाला होता. सर्वत्र त्याची ओळख चंड अशोक म्हणून होउ लागली होती. भारताचा बहुतांशी भाग मौर्य अधिपत्याखाली आला तरी अजूनही कलिंग हे स्वतंत्र राज्यच होते. प्राचीन कलिंग ह्या देशात हे आजच्या आधुनिक भारतातील ओडिशा तसेच छत्तीसगड व झारखंड मधील काही भाग येतात.
कलिंग युद्धाची कारणे अजून स्पष्ट होत नाहीत. सामाजिक तसेच आर्थिक कारणे ही मुख्य मानली जातात. त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे कलिंग हे प्रबळ राज्य होते. मौर्यांच्या पूर्वीच्या मोहिमांना फारसे यश लाभले नव्हते. तसेच बाह्य जगाशी व्यावसायवृद्धीसाठी अशोकाला समुद्र किनाऱ्यावर सत्ता हवी होती, जी कलिंगाकडे होती. तिसरे कारण अजूनही स्पष्ट नाही ते म्हणजे कलिंग हे खनिज समृद्ध देश होता. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अशोकाने युद्ध केले असावे. कारणे असली तरी युद्ध होण्यासाठी सबळ कारणाची गरज होती. युद्ध साधारणपणे इस पूर्व २६५ सुमारास सुरू झाले. सुशीमच्या एक भावाने कलिंगामध्ये मदत घेतली होती. अशोक ने हे कारण मानले व कलिंगला शरण येण्यास सांगितले.
सुरुवातीच्या लढायांमध्ये कलिंगाच्या सेनापतींनी चांगलीच झुंज दिली व अशोकाच्या सैन्याला मात दिली. या पराभवाने अजून अशोकाने चवताळून जाउन अजून मोठ्या सैन्यासह कलिंगावर आक्रमण केले. कलिंगाच्या सैन्याने मोठ्या धैर्याने युद्ध लढले परंतु अशोकाच्या सैन्य ताकद व सैनिकी डावपेचापुढे काही चालले नाही. अशोकाने पुढे सैन्याला संपूर्ण कलिंग मध्ये दहशत माजवला मोठ्या प्रमाणावर लोकांचे शिरकाण करण्यात आले. या युद्दाच्या शिलालेखावरील नोंदींनुसार साधारणपणे १ लाखाहून अधिक सैनिक व नागरिक मारले गेले होते. मोठ्या प्रमाणावर नागरिकांना हद्दपार करण्यात आले.
बौद्ध धर्माचा स्वीकार व प्रसार[]
अशोकाने कलिंगचे युद्ध पार पडल्यानंतर जिकलेल्या रणांगणाची व शहरांची पहाणी करायची ठरवली, व त्यावेळेस त्याने पाहिले ते फक्त सर्वत्र पडलेले प्रेतांचे ढीग, सडणाच्या दुर्गंध, जळलेली शेती, घरे व मालमत्ता. हे पाहून अशोकाचे मन उदास झाले व यासाठीच का मी हे युद्ध जिंकले व हा विजय नाहीतर पराजय आहे असे म्हणून त्या प्रचंड विनाशाचे कारण स्वता:ला मानले. हा पराक्रम आहे की दंगल, व बायका मुले व इतर अबलांचा हत्या कशासाठी व यात कसला प्रराक्रम असे स्वता:लाच प्रश्ण विचारले. एका राज्याची संपन्नता वाढवण्यासाठी दुसऱ्या राज्याचे अस्तित्वच हिरावून घ्यायचे. ह्या विनाशकारी युद्धानंतर शांती, अहिंसेचा, प्रेम दया ही मूलभूत तत्त्वे असलेला बौद्ध धर्मियांचा मार्ग अशोकाने अवलंबायचे ठरवले व तसेच त्याने स्वता.ला बौद्ध धर्माचा प्रसारक म्हणूनही काम करायचे ठरावले. या नंतर अशोकाने केलेले कार्य त्याला इतर कोणत्याही महान सम्राटांपेक्षा वेगळे ठरवतात. इतिहासातील एक अतिशय वेगळी घटना ज्यात क्रूरकर्मा राज्यकर्त्याचे महान दयाळू सम्राटात रुपांतर झाले. बौद्द धर्माचा जगभर झालेल्या प्रसारास खूप मोठ्या प्रमाणावर अशोकाने केलेले कार्य जवाबदार असे बहुतेक इतिहासकार मानतात.
अशोकाच्या ह्या कार्यात त्याच्या देवी पासून झालेल्या मुलांची मोठी मदत झाली. अशोकाचा मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्राह्यांनी भारताबाहेर श्रीलंकेत जाउन तेथील राजाला बौद्द धर्माची शिकवण दिली यामुळे भारतापुरते मर्यादित राहिलेला हा धर्म भारताबाहेर पसरण्यास सुरुवात झाली. असे मानतात की अशोकाने बौद्द धर्मियांसाठी हजारो स्तूपांची व विहारांची निर्मिती केली. आकडा खूप असला तरी त्यातील काही स्तूपांचे अवशेष आजही पहावयास मिळतात. यातील मध्यप्रदेशात सांची येथील स्तूप प्रसिद्ध आहे, हा स्तूप अशोकाने बांधला असे मानतात. अशोकाने आपल्या कारकीर्दीतील पुढील वर्षांमध्ये अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले, जंगलामध्ये चैनिसाठी होणारी प्राण्यांची शिकारीवर बंदी आणली, प्राण्यांवर कोणत्याही प्रकारची हिंसकतेवरही बंदी आणली तसेच शाकाहाराला प्रोत्साहन देण्यात आले. शिक्षा मिळालेल्या कैद्यांना अशोकाने सहिष्णू पणे वागवले. गुणी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी अनेक विद्यापीठे तसेच, शेतकऱ्यांसाठी पाण्याचे कालवे बांधले. त्याच्या राज्यात सर्व प्रकारच्या जातीधर्माच्या लोकांना सहिष्णूरित्या वागवले जाई. तसेच अशोकाने आपले एकेकाळी ज्याच्यांशी युद्धे केली त्यांच्याशीही मैत्रीपूर्ण संबध वाढवले.सम्राट अशोकाने अनेक समाजोपयोगी कार्ये केली.
अशोकाने आपल्या कारकीर्दीत राज्यात अनेक रुग्णालये व महामार्गाचे जाळे निर्माण केले, रस्त्यांच्या कडेला वृक्षांची लागवड असे मानतात की अशोकाचीच कल्पना आहे. आपण सम्राट असल्याचा अधिकाराचा फायदा त्याने समाजोपयोगी कार्यासाठी केला. त्यानंतर अशोकाला धम्मअशोक असे म्हणू लागले. अशोकाने धम्माची प्रमुख आचारतत्वे विशारद केली, अहिंसा, सर्व जाती धर्मांबद्दल सहिष्णुता, वडिलधाऱ्या माणसांना मान देणे, संत ब्राम्हण, शिक्षकांना योग्य तो मान देणे, दासांना माणुसकीने वागवणे. अश्या आचार तत्त्वांना जगात कोणताही समाज नाकारु शकणार नाही.
अशोकाच्या इतिहासकारांनुसार त्याने कलिंगाच्या युद्धा नंतर कोणतेही प्रमुख युद्ध छेडले नाही परंतु त्याला शेजारी राष्ट्रांशी ग्रीक राज्ये, चोल साम्राज्ययाच्याशी त्याला नेहेमी युद्धाची शक्यता वाटत होती. परंतु अशोकाने पूर्वायुष्यातील केलेल्या मोहिमांमुळे व मगधच्या सामर्थ्यामुळे अशोकने बौद्ध धर्म स्वीकारला तरी त्याच्या शेजारी राज्यांनी छेडण्याचे साहस केले नाही. तसेच बौद्ध धर्म स्वीकारला, अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले तरी मगधाचे सैनिकी सामर्थ्य अबाध्य ठेवले. अशोकाला ग्रीक जगताची माहिती होती असे कळते. तसेच चंद्रगुप्त मौर्याने केलेल्या ग्रीकांविरुद्दच्या मोहिमांमुळे मौर्य साम्राज्याची किर्ती ग्रीस, इजिप्त पर्यंत पोहोचली होती असे कळते.
Comments
Post a Comment